Category: Travel

किल्ल्यापलीकडील रायगड

Posted By : Sidhesh Save/ 1989 0

रायगड म्हणजे फक्त किल्ला नाही ! रायगड म्हणजे राजांचे एक असे स्वप्न आहे की ज्याची स्वप्नपूर्ती होऊन ते साक्षात अवतरले आहे. रायगड हे असंख्य शिवभक्तांचे प्रेरणास्थान आहे . रायगड एक भावना आहे , एक संकल्पना आहे. रायगड प्रचंड ऊर्जेचा असा स्त्रोत आहे की ज्याची ऊर्जा आपल्या नसानसांत वाहते आहे.
रायगडाच्या मातीचा प्रत्येक कण, तेथील दगड, तेथील पावसाचा प्रत्येक थेंब, तेथे घोंगवणारा वारा शिवाजी राजांचा जयजयकार करत असतो. तेथील चराचरात आपल्याला शिवरायांचे वास्तव्य जाणवते.
आजही रायगडावर महादरवाज्यापाशी पहारेकरी दक्षतेने उभे असतात. आजही ते दोन मनोरे दिव्यांनी प्रज्वलित होतात, आजही त्यातील पाण्याचे कारंजे चालू आहेत आणि त्याचे सुंदर असे प्रतिबिंब गंगासागर तलावात पडते आहे. पालखी दरवाज्यातून अनेक पाहुणे मंडळी नजराणे घेऊन येत असतात. आजही होळीच्या माळावर मोठे उत्सव साजरे केले जातात. आजही बाजारपेठेत अनेक व्यापाऱ्यांची रेलचेल चालू असते. आजही सिंहसनारुढ रयतेचा राजा राजदराबारात रयतेच्या समस्या सोडवतोय आणि स्वराज्याचा कारभार बघतोय आणि जिजाऊ आपल्या शिवबाकडे कौतुकाने पाहत आहेत. तेथे टकमक टोकांवरून तोफांचे आवाज गर्जत आहेत. जगदीश्वराच्या मंदिरात शंभू महाराज देवाला अभिषेक घालत आहेत. कोठेतरी ‘महाकवि भूषण’ महाराजांच्या स्तुती करणारी कविता , पोवाडे गात आहेत. संपूर्ण प्रजा सुखी आहे. आनंदी-आनंद आहे.. या साऱ्या फक्त इतिहासात घडून गेलेल्या गोष्टी नसून, अशा एक ना अनेक घटना आजही रायगडावर घडत आहेत. परंतु त्या नुसत्या डोळ्यांनी दिसणार नाहीत! हे सर्व तुम्हाला तुमच्या हृदयातून पाहावे लागते आणि त्या साठी इतिहासाची दृष्टी हवी! त्या साठी इतिहास फक्त शाळेच्या पुस्तकात मर्यादित न राहता तो जगता यायला हवा!
खरंच महाराष्ट्राला लाभलेला असा वैभवशाली इतिहास जगायला पाहिजे आणि तो जगवायला पाहीजे ….

 

-सिद्धेश सावे

कळसुबाई- एक भावनात्मक सफर

Posted By : admin/ 1996 1

कळसुुबाई शिखराची ट्रेक माझ्यासाठी नेहमीच स्पेशल असते. अशीच ट्रेक आम्ही यंदा दिवाळीच्या आधी आयोजित केली होती. पण या ट्रेक ला काहीतरी वेगळं करण्याचा विचार माझ्या मनात आधी पासून होता. कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावाला मी अनेकदा भेट दिलेली. कळसुबाईच्या कुशीत लपलेले हे छोटेसे परंतु निसर्गाचे वरदान लाभलेले गाव! कळसुबाई म्हणजे महाराष्ट्रातले सर्वात उंच शिखर. दरवर्षी येथे हजारो ट्रेकर येऊन जातात . एवढे सर्व असून सुद्धा बारी गावातील परिस्थिती हलाखीची आहे. गाव अजुन ही गरिबीच्या छायेखाली आहे . याच गावातील लोकांसाठी काहीतरी छोटीशी मदत करायचे असे मी ठरवले . २३ ऑक्टोबर ला आम्ही एकूण ५७ ट्रेकर्सनी कळसुबाई सर केला. मी सर्व ट्रेकर्स ना आपल्या सोबत येताना वापरण्या योग्य असे कपडे सोबत आणण्यास सांगितले .

कळसुुबाई शिखराची ट्रेक माझ्यासाठी नेहमीच स्पेशल असते. अशीच ट्रेक आम्ही यंदा दिवाळीच्या आधी आयोजित केली होती. पण या ट्रेक ला काहीतरी वेगळं करण्याचा विचार माझ्या मनात आधी पासून होता. कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावाला मी अनेकदा भेट दिलेली. कळसुबाईच्या कुशीत लपलेले हे छोटेसे परंतु निसर्गाचे वरदान लाभलेले गाव!  कळसुबाई म्हणजे महाराष्ट्रातले सर्वात उंच शिखर. दरवर्षी येथे हजारो ट्रेकर येऊन जातात . एवढे सर्व असून सुद्धा बारी गावातील परिस्थिती हलाखीची आहे. गाव अजुन ही गरिबीच्या छायेखाली आहे . याच गावातील लोकांसाठी काहीतरी छोटीशी मदत करायचे असे मी ठरवले . २३ ऑक्टोबर ला आम्ही एकूण ५७ ट्रेकर्सनी कळसुबाई सर केला. मी सर्व ट्रेकर्स ना आपल्या सोबत येताना वापरण्या योग्य असे कपडे सोबत आणण्यास सांगितले . ट्रेकर्सनी सुद्धा आमच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद दिला . ट्रेक पूर्ण झाली आणि आम्ही परतीसाठी निघणार त्या आधी मी गावातील एका ओळखीच्याला सोबत घेऊन सर्व लहान मुले व गावकरी यांना जमा केले. त्यांच्यांमध्ये ते कपडे वाटण्यात आले . दिवाळी च्या आधी मिळालेले हे त्यांच्यासाठी surprise गिफ्ट च होते जणू.सर्वांचे चेहरे आनंदाने फुलून गेले . कपडे वाटताना तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर सर केल्या सोबतच आपण काहीतरी सामाजिक कार्य केले आहे याच समाधान सर्व ट्रेकर्सना वाटत होते. हेच समाधान घेऊन सर्व ट्रेकर्स पुन्हा मुंबई -आपल्या घरी रवाना झाले. अशा या तरुण पिढीला साहस व सामाजिक बांधिलकीची जाण आहे याची जाणीव प्रकर्षाने मला या ट्रेक मध्ये आली आणि अशा क्रांतिकारी विचारांच्या तरुणांसोबत ही ट्रेक यशस्वीरित्या पार पडली,याचा मला फार अभिमान वाटतो.